ही फुलं सुकली असतील कदाचित,
पण त्यामागच्या भावना सुकणार नाहीत कधीच,
ह्यांचा सुगंध नसेल दरवळत आता,
पण धुंद करून गेलाय कधीतरी तो।
रंग फिके पडले असतील कदाचित,
पण अंतरंग बघ ते विटणार नाहीत कधीच,
कारण प्रत्येक फुलाला माहित असतं,
एक दिवस येणार,
क्षणिक सुखाचा सुगंध सांडून
आपण अन सुकणार.
तरीही प्रत्येक फुल,
नव्या उमेदीनं फुलतं
सुगंध उधळत चहू दिशांना ,
मंद हवेवर झुलतं...
- प्रदीप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा