Saturday, January 9, 2010

राहून गेलेल्या गोष्टी !

राहून गेलेल्या गोष्टी !

- लहानशी विहीर खणून केलेली शेती.
-ज्वारीच्या धांडयाची बैलगाड़ी.
-पावसाळ्यात खुपसनिचा खेळ.
-मातीच्या गोळ्यांचा बोंम्ब हल्ला
-सुरपारम्ब्यांचा खेळ
-दिवाळीचा किल्ला
-गणपति बाप्पाची हातानी केलेली मूर्ति
- धामण दरी मधील बोरे चिंचा चारं जांभूळ कैरया ऊसं गोळा करायला जायचंय
- गुर्हाळात जावून आलं टाकलेला उसाचा रस अन गरमागरम गुळ खायचाय.
-आज्जीबाई तूप लोणी चा खेळ
-लगोरी, लंगडी, सागरगोटे इ.
-घरी न सांगता पोहायला जायचंय.
-स्केटिंग करायचं
-तान्हा पोळा साजरा करायचाय.
-दसऱ्याला रावण दहन करायचंय
- पोटभर गरमागरम कांदेपोहे / उकडीचे मोदक खायचे आहेत
- उन्हात तहानभूक विसरून क्रिकेट खेलायचय.
-पडत्या पावसात निसरड्या चिखलात फुटबाल खेळायचाय.
-उबदार गोधडीत शिरून खिडकीतला मुसळधार पाऊस बघायचाय
-लपंडावाचा राज्य घ्यायचाय ... आठवडाभर :)
-बांबू पासून धनुष्य बाण बनवून "रामायण" स्टाईल लढाई करायचीये
-चोर पोलीस खेळत गावभर फिरायचय.
- प्राथमिक शाळेतल्या सरांना शाळेत जावून भेटायचय... पायाला हात लावून नमस्कार करत सांगायचय.. ह्याच वर्गात बसून मार खाल्लाय तुमच्या हातचा :)



चीअर्स!
- प्रदीप

No comments:

Post a Comment